देशनवी दिल्ली

आता दिवाळीनंतरच महाराष्ट्रात निवडणुका;ऑक्टोबरमध्ये घोषणा होण्याचे संकेत

एकाच वेळी चार राज्यात निवडणुका घेणे शक्य होईल असे नाही. सध्या जम्मू काश्मिरात विधानसभा निवडणुका पार पाडणे हे आव्हानाचे काम आहे. एकावेळी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली असल्याच तो पुर्ण कालावधी झाल्याशिवाय निवडणूक आयोग दुसऱ्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करत नाही.

यामुळे आता महाराष्ट्रात निवडणुका कधी या प्रश्नाचे उत्तर म्हणजे जम्मू काश्मीर आणि हरियानाच्या निवडणुका झाल्यानंतर साधारणतः चार ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा आयोग करू शकते.

जम्मू काश्मीरमध्ये आज निवडणुका घोषित झाल्या निवडणुकीच्याच काळात अर्थात सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात अनेक सण आहेत. ते याच काळात येत असतात. पितृ पक्ष, नवरात्री, दसरा आणि दिवाळी या सणांमुळे महाराष्ट्रातील निवडणुकींची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता दिवाळीनंतरच महाराष्ट्रात निवडणुका होतील हे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रासह झारखंडच्या निवडणुका होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *