राज्यात अवकाळीचा धिंगाणा,फळबागा आणि शेती पिकांचे अतोनात नुकसान
बीड जिल्ह्यात वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू
आष्टी तालुक्यातील सुर्डी येथील महादेव किसन गर्जे हे शनिवारी दुपारच्या दरम्यान दोन शेळ्या घेऊन सुर्डी नागतळा रोडवरील सर्व्हे नंबर दहा या शेतात गेले होते. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पाऊस वाढल्याने ते एका झाडाखाली थांबले. मात्र, याचवेळी झाडावर वीज कोसळून त्यांचा जागीच मुत्यू झाला. यात त्यांच्यासह दोन शेळ्या देखील मृत झाल्या आहेत. वादळी वाऱ्यासह विजेच्या कडाकडासह पाऊस झाल्याने शेतकर्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
राज्यात पुन्हा एकदा अककाळी पाकसाने धिंगाणा घातला असून शेतकऱयांची झोप उडकली आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह राज्यातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावल्याने फळबागा आणि अन्य शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
सिंधुदुर्ग आणि मराठवाडय़ातील काही गावांत गारांचा वर्षाव झाला. दरम्यान, 10 एप्रिलपर्यंत पावसाळी वातावरण राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितल्याने शेतकऱयांची चिंता वाढली आहे.
शुक्रवारी रात्रीपासून राज्यातील बहुतांश भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. शनिवारीही काही भागांत पावसाचा जोर होता. सिंधुदुर्ग जिह्यातील कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यात ठिकठिकाणी पाऊस कोसळला. कुडाळ तालुक्यातील काही भागांत सोसाटय़ाच्या वाऱयासह गारांचा वर्षाव झाला. यामुळे रब्बी हंगामातील आंबा, काजू, कोकम, सुपारी आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले.
विदर्भात बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावतीपर्यंत पावसाने हजेरी लावली. मराठवाडय़ाला खेटून असलेल्या बुलढाणा, जळगाव, नगर जिह्यांनाही अवकाळीने जबर तडाखा दिला. एप्रिलमध्ये पावसाळी वातावरण बघण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे अनेक शेतकऱयांनी सांगितले. या पावसाने उरल्यासुरल्या पिकांचीही नासाडी केली. पपई, खरबूज, टरबूज, आंबा, संत्री, कांदा पिकांचा अक्षरशः चिखल झाला.
गव्हाचे उत्पादन घटणार
बेमोसमी पावसामुळे या वर्षी देशातील गहू उत्पादनात 10 ते 20 लाख टनांची घट होण्याची शक्यता फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सूत्रांनी व्यक्त केली. मात्र केंद्रीय अन्न मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुबोधसिंह यांनी अवकाळी पावसाने 10 ते 20 लाख टन गव्हाचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली आहे.
वीज कोसळल्याने 9 बकऱया ठार
जळगाव जिह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील रामगड येथील तलाकाच्या भिंतीजकळ वीज कोसळल्याने नऊ बकऱया ठार झाल्याची दुर्दैकी घटना शुक्रकारी घडली आहे. यात सुदैकाने गुराखी बचाकला आहे. या घटनेत गुलाबसिंग बिलाले यांच्या 5 शेळय़ा, तारासिंग बिलाले यांच्या 3 शेळय़ा, लटु बिलाले यांची 1 अशा एकूण 9 शेळय़ा मृत्युमुखी पडल्या आहेत.
वीज पडून आठ जणांचा मृत्यू
राज्यात वादळी वाऱयासह पाऊस झाला आणि विजाही कोसळल्या. त्यात आठ जणांचा मृत्यू झाला. सिल्लोड तालुक्यात वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला. औंढा नागनाथ तालुक्यात बोरजा येथेही एक वीजबळी गेला. परभणी जिह्यात मानवत तालुक्यात मांडेवडगाव येथे वीज पडून महिलेचा मृत्यू झाला. बुलढाणा तसेच अमरावती जिह्यात वीज पडून तीन, तर भिंत कोसळून एका मुलीचा मृत्यू झाला. कोल्हापुरातही वीज पडून एकाचा मृत्यू झाला.