महाराष्ट्रमुंबई

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ:२५ टक्के बदल्यास परवानगी

मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांसाठी ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रत्येक विभागास कमाल २५ टक्के  कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे.


करोनाची साथ असल्यामुळे तसेच तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन चालू आर्थिक वर्षात सुरुवातीस बदल्यांना बंदी करण्यात आली होती. मात्र मंत्र्यांच्या नाराजीनंतर ३१ जुलैपर्यंत १५ टक्के  कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना परवानगी दिली होती. आता ही मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून १५ टक्केऐवजी २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्वसाधारण बदल्या ९ ऑगस्टपर्यंत तर विशेष कारणास्तव करण्यात येणाऱ्या बदल्या ऑगस्टअखेरपर्यंत करण्यास परवानगी देण्यात आली  आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *