ऑनलाइन वृत्तसेवा

राज्यात किती दिवसांचा लॉकडाउन लागणार?मुख्यमंत्री निर्णय जाहीर करणार

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्सची बैठक झाली आहे. या बैठकीत प्रामुख्याने राज्यात पूर्ण लॉकडाउन लागू करावा का, तो ८ दिवसांचा असावा की १४ दिवसांचा असावा, याबाबत विचारविनिमय केला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात ८ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीला राज्यातील प्रसिद्ध डॉक्टर्स उपस्थित असून काही इतर तज्ज्ञही सहभागी झाले होते,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या निर्णय घेऊन लॉक डाऊन घोषित करतील