बीड

बीड जिल्ह्यात 15 एप्रिल पर्यंतच निर्बंध लागू:नेमके आदेश कोणते पहा

बीड, दि.४:–जिल्हयात २६ मार्च २०२१ पासून लागू असलेले लॉकडाऊन मधील निर्बंध वगळून कोरोना विषाणू ( कोविड-१९ )प्रादुर्भाव नियंत्रणासाठी उपाययोजनाबाबत दिशानिर्देश लागू करण्यात येत आहेत असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले आहेत.

राज्य शासनाने राज्यात कोविड-19 संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असलेने कोविड-19 विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी तातडीने काही उपाययोजना करण्यात आल्याचे सूचित केले आहे या अनुषंगाने जिल्ह्यात काही सूचनांचे काटेकोर पालन करणेसाठी निर्बंध दिनांक 15 एप्रिल 2021 रोजी रात्री 24.00 वा. पर्यंत लागू करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यात 26 मार्च ते 4 एप्रिल 2021 या कालावधीतील लॉकडाऊन होते ते मागे घेत त्यामधील काही निर्बंध कायम ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात कोविड-19 संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखणेसाठी पुढील मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

अ) कोविड़-19 संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना,

१) मुखपट्टी / मास्कचा वापर सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी त्याच प्रमाणे सार्वजनिक व खाजगी वाहनातून प्रवास करताना मुखपट्टी/ मास्क वापरणे बंधनकारक असेल.

२) सामाजिक अंतर राखणे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना दोन व्यक्तीमध्ये किमान 6 फूटाचे अंतर राखणे बंधनकारक असेल. व्यापारी आस्थापनांमध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर राखले जाईल याची दक्षता घेणे बंधनकारक असेल आणि अशा आस्थापनांमध्ये एका वेळी पाच पेक्षा जास्ती ग्राहक / व्यक्ती असणार नाहीत.

३) सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास प्रतिबंध-सार्वजनिक ठिकाणी थुकणाऱ्या व्यक्ती विरुद्ध त्या त्या संबंधीत प्राधिकरणाने कायदे व नियम याद्वारे निश्चित केलेल्या दंडाची आकारणी करणेत यावी.

४) सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, गुटखा, तंबाखू, सुपारी इ. खाण्यास / पिण्यास प्रतिबंध करणेत येत आहे.

५) खाजगी, शासकिय – निमशासकीय कार्यालये त्याचप्रमाणे व्यापारी – औद्योगिक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यकतेप्रमाणे घरुन काम करणेची मुभा देणेत यावी, कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, बाजार तसेच औद्योगिक आस्थापनांच्या कामाच्या वेळांमध्ये अशा ठिकाणी काम करणाऱ्या लोकांची गर्दी होणार नाही अशा पध्दतीने

विभागणी करावी.

६) सर्व आस्थापनांमध्ये येणारे कर्मचारी / ग्राहक यांच्येसाठी शरीराचे तापमान तपासणे, हात धूणे आणि सॅनिटायझरची सुविधा पुरवून सर्व येण्या आणि जाण्याच्या दारांमध्ये (प्रवेश व बहिर्गमन ) आणि सामुदायीक जागांच्या ठिकाणी या उपाययोजना ठेवाव्यात.

७) सर्व आस्थापनांमधील कामाची जागा, सामुदाईक वापराची ठिकाणी त्याच प्रमाणे व्यक्तींचा एकमेकांशी संपर्क येईल अशी ठिकाणे वारंवार निजतुक करणेत यावीत.

८) सर्व प्रकारच्या आस्थापनांमधील व्यवस्थापन तिथे काम करणाऱ्या कामगारांमध्ये सामाजिक अंतर राखले जाईल. दोन कामाच्या पाळ्यांमध्यो अंतर असेल व कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या वेळा भिन्न-भिन्न असतील याची दक्षता घेतील.

ब) खालील प्रतिबंधात्मक उपाय योजना व निर्बंध 15 एप्रिल 2021 चे मध्यरात्री 24.00 वाजेपर्यत लागू राहतील.

1) कंटेन्टमेंट झोन-प्रतिबंधीत क्षेत्राबाबत त्यासाठी स्थानिक प्रशासनाने घोषित केलेली प्रतिबंधीत क्षेत्रे पुढील आदेशा पर्यंत कायम राहतील,

i) केंद्र शासन व राज्य शासनाने वेळोवेळी कंटेन्टमेंट झोन तयार करणेविषयी दिलेल्या सर्व सुचना या पुढील आदेशापर्यंत कायम राहतील.

ii) प्रतिबंधीत क्षेत्रांमध्ये सकारात्मक चाचणी (कोरोना पॉझिटीव्ह)आलेल्या सर्व व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी तयार करणे, त्यांचा मागोवा घेणे, त्यांची ओळख पटवणे, त्यांचे अलगिकरण करणे आणि त्यांचा 14 दिवसांपर्यंत पाठपूरावा करणे. (सकारात्मक व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीपैकी 80% व्यक्तीना 72 तासांमध्ये शोधून काढणे.)

प्रतिबंधात्मक आदेशानुसार बीड जिल्ह्यात दिनांक 4 एप्रिल 2021 च्या मध्यरात्री १२ वाजेपासून सायंकाळी 8 वाजेपासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत पुढील निर्बंध लागू राहतील.

2)पाच (5) पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येणेस मज्जाव असेल, याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती प्रत्येकास रक्कम रु. 1000/- (प्रती व्यक्ती एक हजार रुपये) दंडास पात्र राहतील.

3) सर्व सार्वजनिक ठिकाणे (बगिचे) बंद राहतील, याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती प्रत्येकास रक्कम रु. 1000/- (प्रती व्यक्ती एक हजार रुपये) दंडास पात्र राहतील.

4) कोणतीही व्यक्ती मास्क परिधान न केलेली आढळल्यास रक्कम रुपये 500/- (पाचशे रुपये) दंडास पात्र राहील. सार्वजनिक ठिकाणी कोणतीही व्यक्ती थुंकताना आढळल्यास रक्कम रु. 1000/- (एक हजार रुपये)दंडास पात्र राहील.

5) मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे आदेशानुसार जिल्ह्यात सायंकाळी ८ वाजेपासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व सिनेमा हॉल मॉल्स, सभागृहे आणि रेस्टॉरंटस् बंद राहतील.

परंतु रेस्टॉरंट मधून सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत फक्त होम डिलीव्हरी व पार्सल सुविधा देणेस परवानगी असेल,

6) जिल्ह्यातील फक्त चहा विक्री करणाच्या चहा टपरी व पान टपरी धारकांना त्यांच्या दुकानासमोर सहा फुटांचे मार्कींग करुन सामाजिक अंतर राखून मास्क वापरणाऱ्या ग्राहकांनाच विक्री करता येऊ शकेल, सहा फुटांचे अंतर राखले जात नसल्यास तसेच

दुकानावर मास्क नसलेले ग्राहक आढळल्यास संबंधीत हे रु. 500/- दंड / सिल करण्याच्या कारवाईस पात्र राहतील.

7) जिल्ह्यातील भाजी विक्रेते / फळ विक्रेते / दुकानदार यांनी अॅन्टीजन / तपासणी केल्याचे निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र तपासणी वेळी सोबत असणे आवश्यक आहे. तपासणी दरम्यान संबंधीताकडे निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र नसेल तर संबंधीत हे रु. 500/- दंड/सिल करण्याच्या कारवाईस पात्र राहतील.

8) ‘मास्क नाही प्रवेश नाही’ (“NO Mask – No Entry’ ) हा फलक सर्व खाजगी, शासकीय, निमशासकीय कार्यालये, उद्योग, दुकाने,बाजार इत्यादी ठिकाणी लावणे व त्याचे पालन करणे अशा आस्थापना / कार्यालयांचे प्रमुखांवर बंधनकारक असेल. ज्या आस्थापना कार्यालये सदर अटींचे उल्लंघन करतील त्या आस्थापनांचे व कार्यालयांचे प्रमुख वैयक्तीकरित्या त्याच प्रमाणे अशा आस्थापना कार्यालये संस्था म्हणून एकावेळी रक्कम रु. 1000/- दंडास पात्र राहतील.

कोरोना संसर्ग बचावासाठीच्या या व पूर्वीच्या आदेशातील अटी -शर्तीचा भंग केल्यास, संबंधित सिनेमागृहे, हॉटेल्स ,रेस्टॉरंट ही कोव्हीड़ -19 विषाणु संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असे तोपर्यंत बंद राहतील. तसेच संबंधित आस्थापना मालक हे आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दंड वसूल करणेस पात्र राहतील.

१) मा मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडिल दि.27.03.2021 च्या आदेशानुसार कोणतोही सामाजिक / सांस्कृतिक / राजकीय / धार्मिक कार्यक्रम, सभा, मोर्चे, मिरवणूका, संमेलने तसेच यात्रा, उत्सव, उरुस इत्यादींचे आयोजन करणेस परवानगी असणार नाही. सभागृहे व नाटयगृहें देखील सदर कार्यक्रम / मेळावे/ सभा यांचे आयोजन करणेस वापरु नयेत. सदर आदेशाचा भंग केल्यास, संबंधित कार्यक्रमाचे आयोजक जागा व मालक हे आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दंड वसूल करणेस तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील. तसेच संबंधित सभागृहे

/ इतर ठिकाणे ही कोविड -19 विषाणू संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असे तोपर्यंत बंद केली जातील.

10) विवाह समारंभ कार्यक्रमास फक्त 50 नामगरीकांना उपस्थिती राहण्यास परवानगी असेल. विवाह समारंभास संबंधीत पोलीस निरीक्षक यांची परवानगी घेणे आवश्यक असेल. तसेच विवाह समारंभास उपस्थित राहणाऱ्या 50 व्यक्तींची यादी अॅन्टीजन /आरटीपीसीआर तपासणी निगेटीव्ह असल्याच्या प्रमाणपत्रासह संबंधीत तहसिलदार यांच्याकडे सादर करणे अनिवार्य असेल. सदर आदेशाचा भंग केल्यास, संबंधित कार्यक्रमाचे ठिकाण हॉल मालक हे आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दंड वसूल करणेस पात्र राहतील.

तसेच संबंधित ठिकाणे / हॉल ही कोव्हीड -19 विषाणु संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असे तोपर्यंत बंद केली जातील.

11) अंत्यविधी/अंत्ययात्रा इत्यादी कार्यक्रमामध्ये सहभागी होणेस फक्त 20 नागरिकांना परवानगी असेल. स्थानिक प्राधिकरण यांनी या अटींचे पालन केले जात असलेबाबत खात्री करणे,

12) गृह अलगीकरणास खालील प्रतिबंधास अधिन राहून परवानगी असेल.

१) गृह अलगिकरण झालेल्या नागरिक, रुग्णांविषयीची माहिती संबंधित स्थानिक प्राधिकरण यांना कळविणे. तसेच तसेच गृह अलगीकरण व्यक्ती ही कोणत्याही वैद्यकीयव्यावसायिकाच्या (डॉक्टर ) यांचे देखरेखीखाली आहे याची देखील माहिती स्थानिक प्रशासनास देणे बंधनकारक असेल.

II)कोविड -19 रुग्ण असलेल्या ठिकाणी सुरवातीच्या दिवसापासून 14 दिवसापर्यंत दर्शनी ठिकाणी फलक लावावा लागेल, जेणेकरून त्या ठिकाणी कोव्हीड -19 रुग्ण असलेची माहिती नागरिकांना होईल.

III)कोव्हीड-19 बाधित (+ Ve) रुग्‍णांच्या हातावर गृह अलगीकरण (Home Quarantine) असा शिक्का मारणे.

IV) सदर कोव्हीड -19 रुग्ण गृह अल्लगीकरण केलेल्या ठिकाणी संबंधित कुटुंबातील व्यक्तीनीही कमीत कमी संपर्क ठेवावा. तसेच मास्क परिधान केल्याशिवाय सदर ठिकाणी प्रवेश केला जाणार नाही. याविषयी दक्षता घेणेत यावी.

गृह अलगीकरणाची कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झालेस सदर कोव्हीड -19 रुग्ण किंवा अलगीकरण झालेले नागरिक यांना स्थानिक प्रशासनाने सुरु केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये (CCC) मध्ये स्थलातरीत केले जाईल.

13) सर्व खाजगी कार्यालये, आस्थापना (आरोग्य व इतर अत्यावश्यक असलेल्या आस्थापना वगळता) ही 50% क्षमतेच्या अधिन राहून सुरू राहतील. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या कार्यालय प्रमुखाने कर्मचारी उपस्थितीबाबत कोविड-19 प्रादुर्भाव

व्यवस्थापनाच्या अनुषंगाने योग्य तो निर्णय घ्यावा. सर्व उत्पादन करणाऱ्या आस्थापना पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील. परंतू अशा आस्थापनांनी प्रत्यक्ष उत्पादनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सामाजिक अंतर राखले जाण्यासाठी आवश्यकते प्रमाणे कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी ठेवणेबाबत सुचित करणेत येत आहे. वस्तूंचे उत्पादन करणा-या घटकातील कर्मचाऱ्यांमध्ये सामाजिक अंतर राखणेसाठी स्थानिक प्राधिकरणाने मान्यता दिल्या प्रमाणे अशा घटकांना कामांच्या पाळ्या वाढविण्याची मुभा असेल. अशी उत्पादन क्षेत्रे खालील बंधनांचे पालन करुन सुरु राहतील.

1)मास्क परिधान केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

2)(NO Mask – No Entry) सर्व ठिकाणी तापमापीचा उपयोग करून शरीराच्या तापमानाची नोंद घेणेत याबी, जेणेकरून ताप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. 3)प्रवेशव्दार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात हँड सॅनिटायझर ठेवणेत यावीत.

4) सर्व आस्थापनांच्या मध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नियुक्त करावे, जेणेकरून सर्व अभ्यांगताबाबत मास्क परिधान केला जाईल. सामाजिक अंतर राखले जाईल याविषयी तपासणी केली जाईल.

5) या आदेशाचा उल्लंघन करणारे संबंधीत घटक हे आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दंड वसूल करणेस तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील. तसेच संबंधित आस्थापना ही कोव्हीड -19 विषाणु संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असे तोपर्यत बंद केली जातील.

14) शासकीय कार्यालयामध्ये गर्दी कमी करण्यासाठी, निवडून आलेले लोकप्रतिनीधी वगळून इतर अभ्यागतांना तातडीच्या कामाशिवाय शासकीय कार्यालयामध्ये प्रवेश करणेस परवानगी असणार नाही. ज्या अभ्यागतांना बैठकीसाठी बोलविण्यात आलेले आहे त्यांच्या बाबतीत विभाग / कार्यालय प्रमुख यांनी विशेष पास निर्गमीत करणेत यावेत.

15) सर्व धार्मिक ठिकाणच्या व्यवस्थापन करणाऱ्या विश्वस्त यांनी संबंधित धार्मिक ठिकाणच्या परिसरामध्ये उपलब्ध असणारी जागा आणि पुरेसे सामाजिक अंतर राखले जाणेच्या दुष्टीकोनातून दर तासाला किती अभ्यांगताना प्रवेश देणेत येईल या संख्येची निश्चिती करून प्रसिध्द करणे. भाविक तसेच अभ्यागतासाठी ऑनलाईन आरक्षण किंवा इतर सोयीच्या पध्दतीचा वापर करणे, वरील ठिकाणी फक्त खालील प्रतिबंधास अनुसरून प्रवेश दिली जाईल याबाबत दक्षता घेणे.

1)मास्क परिधान केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. (NO Mask – No Entry)

2)सर्व ठिकाणी तापमापीचा उपयोग करून शरीराच्या तापमानाची नोंद घेणेत यावी, जेणेकरून ताप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही.

3)प्रवेशव्दार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात हँड सॅनिटायझर ठेवणेत यावीत,

4) सर्व आस्थापनांच्या मध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नियुक्त करावे, जेणेकरून सर्व अभ्यांगताबाबत मास्क परिधान केला जाईल. सामाजिक अंतर राखले जाईल याविषयी तपासणी केली जाईल.

16) परळी येथील श्री.वैद्यनाथ मंदिर व अंबाजोगाई येथील श्री.योगेश्वरी देवी मंदिर फक्त सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत याकालावधीत उपरोक्त सुचनांच्या पालनासह दर्शनासाठी भावीकांकरिता खुले राहिल.

17) ठराविक निर्बंधासह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु करणेत आलेली आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संबंधीत सार्वजनिक परिवहन प्राधिकरणाद्वारे रक्कम रु. 500/- दंडास पात्र राहतील.

18) राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक सेवा पूर्ववत निबंधासह (आदर्श कार्यपध्दती) पाळून चालू राहिल्ल. बसमध्ये प्रवेश देतेवेळी NO Mask – No Entry या तत्वाचा अवलंब करावा, बसमध्ये सॅनिटायझर व्यवस्था उपलब्ध करावी. सामाजिक अंतर राखले जाईल याची काटेकोर दक्षता घ्यावी. याबाबतची सर्व जबाबदारी संबंधीत विभागीय नियंत्रक, म.रा.प.म., बीड यांची असेल.

शक्यतो प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडे अॅन्टीजन/ आरटीपीसीआर तपासणी निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत असावे.

19) यापूर्वी कोविड़ प्रादुर्भाव रोखने व कोविड उपचार या अनुषंगाने वेळोवेळी परवानगी दिलेल्या व प्रतिबंधित केलेल्या बाबी / क्षेत्रे कायम राहतील आणि यापूर्वी दिलेले आदेश सदर आदेशास संलग्न राहतील आणि सदरचे आदेश दिनांक 15 एप्रिल 2021 पर्यंत अस्तित्वात राहतील.

20) कोविड-19 सकारात्मक व्यक्तींचे संपर्क शोधणे सकारात्मक चाचणी आलेल्या व्यक्तींचे लवकरात लवकर अलगीकरण करणे, त्याचे संपर्क शोधून काढून त्यांचे अलगीकरण करणे, बंधनकारक असेल. अशा संपर्कातील व्यक्ती किंवा कोविड-19 बाधीत रुग्णास गृह अलगिकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्यास संस्थात्मक अलगीकरणात राहणे बंधनकारक करणेत येत आहे.

21) जिल्ह्यातील सर्व शैक्षणीक संस्था व सर्व कोचिंग क्लासेस या कार्यालयाच्या पुढील आदेशापर्यंत पुर्णत: बंद राहतील. फक्त इयत्ता 10 वी व 12 वी चे क्लासेस करिता 50% मर्यादेसह चालू ठेवण्यास परवानगी असेल. तसेच फक्त इयत्ता 10 वी 12 वी च्या

विद्यार्थ्यांचे प्रात्याक्षीक व लेखी सराव परिक्षा घेण्यास मुभा असेल.

22) विहीत केलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजना, चाचण्या आणि रुग्ण संपर्क शोधणे याची तंतोतंत अंमल बजावणी करण्याची संयुक्त जबाबदारी संबंधीत महसूल, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस आणि नगरपालिका या सर्व तसेच इतर सर्व संबंधीत विभागाची असेल.

23) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या दि.27 मार्च 2021 चे आदेशानुसार लॉकडाऊन कालावधीतील निर्बंधाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील.

24) या कार्यालयाद्वारे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच इतर अनुषंगीक कार्यालयांद्वारे निर्गमीत करण्यात आलेल्या संबंधीत समन्वय, सनियंत्रण व अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांनी उपरोक्त सूचनांचे पालन केले जात आहे याबाबत

काटेकोर दक्षता घेऊन त्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी बीड यांचेकडे वेळोवेळी सादर करावा असे सूचित केले आहे.

या आदेशांचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासुन लागु करुन खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे.त्यानुसार जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोचिड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषीत करण्यात आले आहे.