ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

राज्यातील वीज ग्राहकांना अखेर मोठा दिलासा:वीजदर कमी करण्याचा निर्णय

मुंबई, – राज्यातील वीज ग्राहकांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. 1 एप्रिल 2021 पासून वीजदर सुमारे 2 टक्के कमी करण्याचा निर्णय एमईआरसीने घेतला आहे. देशात एकीकडे इंधन दरवाढ होत आहे तर सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी एमईआरसीने एफएसी (इंधन समायोजन कर) फंडच्या माध्यमातून वीज कंपन्यांना फंडचा वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश दिले आहे.

एमईआरसीने दिलेल्या माहितीनुसार मार्च 2020मध्ये या एफएसीच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्यास सुरुवात झाली. मार्च 2020 ते मार्च 2021 पर्यंत सर्व रहिवासी, दुकान, कंपनी, इंडस्ट्रीसाठी 10 टक्के वीज दर कमी करण्यात आले. तर या वर्षी 1 एप्रिलपासून ते या संपूर्ण वर्षासाठी टाटा, अदानी, बेस्ट आणि महावितरण यांना वीज दर कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आजच्या वीज नियामक आयोगाच्या निर्णयात कोणतीही दरवाढ जाहीर करण्यात आली नसल्याने ग्राहकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.

महावितरणच्या घरगुती वीज ग्राहकांना राज्य वीज नियामक आयोगाने १ एप्रिल २०२१ पासून लागू होणाऱ्या वीजदरांमध्ये सरासरी १ टक्के वीजबिलात कपात केली आहे. त्यामुळे महावितरणच्या घरगुती ग्राहकांना वीज वापरासाठी आता प्रत्येक युनिटमागे ७.५८ रूपये मोजावे लागतील. अदाणीच्या वीज ग्राहकांसाठीही ०.३ टक्के इतकी वाढ लागू होणार आहे. त्यामुळे अदाणीच्या ग्राहकांना आता ६.५३ रूपये प्रत्येक युनिटसाठी मोजावे लागतील. बेस्टच्या वीज ग्राहकांसाठी ०.१ टक्के इतकी दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे बेस्टच्या वीज ग्राहकांना आता युनिटमागे ६.४२ रूपये मोजावे लागतील. टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांसाठी यंदाच्या १ एप्रिलपासून मोठी वीज दरवाढी जाहीर झाली आहे. टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांना आता युनिटमागे ५.२२ रूपये मोजावे लागतील. टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांसाठी ४.३ टक्के दरवाढ आयोगाने मंजुर केली आहे.

error: Content is protected !!