महाराष्ट्रमुंबई

राज्य सरकारची उद्यापर्यंत नवीन नियमावली:ई-पाससह निर्णय जाहीर होणार

लोकांमध्ये ई-पास यावरून नाराजी आहे. त्यामुळे केंद्राच्या नियमानंतर राज्य सराकर याबाबत नेमकी काय भूमिका घेते हे पाहवे लागणार आहे. राज्य सरकारची उद्यापर्यंत नवीन नियमावली येईल असं सांगितले जाते. केंद्र सरकारने इयत्तेतील वर्ग सुरू कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत.
राज्य सरकारच्यावतीने जिम शाळा सुरू करण्याबाबत सावध पवित्रा घेतला जात आहे. ई-पास वरून लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ई-पास रद्द करावा अशी जोरदार मागणी आहे. पण ग्रामीण भागांमध्ये कोविड संकट वाढत असल्याने राज्य सरकार याबाबत फारसं अनुकूल दिसत नसल्याची चर्चा आहे.
दरम्यान, उद्या मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची सकाळी बैठक होईल आणि त्यानंतर संध्याकाळपर्यंत नवीन नियमावली जाहीर केली जाईल अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे यावेळी अनलॉकच्या नियमांमध्येही काय बदल होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या नियमांनुसार (Unlock 4.0) प्रवासासाठी लागणारी परवानगी E pass आता हद्दपार होण्याची चिन्हं आहेत. कारण नवीन गाईडलाईन्समध्ये राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतुकीसाठी पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही, असं स्पष्ट म्हटलं आहे.

error: Content is protected !!