कधी शिव्या मिळतात तर कधी फुलांचे हार देखील मिळतात,”-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
”सातत्याने राजकारणात टीका सहन करावी लागते आणि लोक तुमचं स्वागत देखील करतात. जेव्हा टीका झाली त्याहीवेळेस मी विचलित झालो नाही कारण माझ्यासमोर एकच ध्येय होतं की समाजाला न्याय द्यायचा आहे. आणि तो न्याय देताना दोन समाज एकमेकांसमोर येणार नाहीत, दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही. याला दिलं म्हणून त्याच्यात अन्यायाची भावना तयार होणार नाही अशा प्रकारचा कायदेशीर निर्णय करावा लागेल. त्यामुळे यासंदर्भात जे काही कायदेशीर आहे त्याचा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतला आहे,याचं श्रेय हे आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीला दिलं पाहिजे, ज्यांनी खूप मेहनत केली आहे. पुढेही समिती समाजासाठी काम करेल.”
“मला दोष दिले, शिव्या दिल्या तरीही मी समाजासाठी काम कालही करत होतो, आजही करतोय आणि उद्याही करेन. मराठा समाज असो, ओबीसी समाज असो, महाराष्ट्रातील कुठलाही समाज असो, प्रत्येक समाजासाठी काम करण मी माझं कर्तव्य समजतो. त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात तर कधी फुलांचे हार देखील मिळतात,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
