ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

उद्याच महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य ठरणार;सत्ता संघर्षाचा निकाल लागणार!

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या म्हणजेच गुरूवारी लागणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालावर महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.

16 आमदरांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टात शिंदे आणि ठाकरे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या याचिकेवर सुप्रीम कोर्ट स्वतः निर्णय देणार की, हे प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणीसाठी पाठवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची विधिमंडळ गटनेतेपदावरून उचलबांगडी केली. मात्र, त्यानंतर शिंदे यांनी स्वतःची नियुक्ती केली. मात्र, ही नियुक्ती वैध आहे का? मुख्य प्रतोपदी सुनील प्रभू यांची नियुक्ती वैध की, भरत गोगावले यांची नियुक्ती योग्य?

या आमदारांवर टांगती तलवार

एकनाथ शिंदे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय शिरसाट, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनावणे, रमेश बोरणारे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, महेश शिंदे, अनिल बाबर, संजय रायमुलकर, बालाजी कल्याणकर आमदार अपात्रतेचा मुद्दा अध्यक्षांकडे? 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभेत आला तर याबाबत निर्णय विधानसभा अध्यक्ष घेणार का आमदारांना नोटीस पाठवणारे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ घेणार? याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. 16 आमदारांना नोटीस पाठवली तेव्हा विधानसभा अध्यक्षपद रिक्त होतं, त्यामुळे उपाध्यक्षांनी नोटीस पाठवील, पण आता विधानसभा अध्यक्ष असताना अपात्रतेचा मुद्दा आपल्याकडेच येईल, असा दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *