ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

आज ठरेल;लॉकडाऊन जाहीर होणार की आणखी कडक निर्बंध

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतच आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. लस आल्यामुळे कोरोना गेल्याचा लोकांमध्ये गैरसमज वाढला आहे. त्यातच सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, नागरिकांचा बेजबाबदारपणा यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख वाढतच चालला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कोरोनाचा सामना करण्यासाठी पुढची रणनीती आखली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, कोरोनाचे रुग्ण वाढत असतील तर काही शहरांमध्ये लॉकडाऊन करावा लागेल असे म्हटले होते. आज याच मुद्द्यावर आरोग्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.

राज्यात कडक निर्बंध लावायचे किंवा लॉकडाउनचा निर्णय याबाबत चर्चा होऊ शकते. लॉकडाऊन टाळायचे असेल तर कोरोनासंबंधीच्या नियामांचे पालन नागरिकांना करावे लागेल.