ऑनलाइन वृत्तसेवाबीड

बीड जिल्ह्यातील 17 धरणे भरली;48 मंडळात अतिवृष्टी

बीड/प्रतिनिधी

– बीड जिल्ह्यातील 17 धरणे 100 टक्के भरली असून, 2 धरणे ही 90 टक्क्यांच्या आसपास आहे. केवळ माजलगावमधून विसर्ग करण्यात येत आहे.वडवणी तालुक्यात काही गावांचा संपर्क तुटला आहे. तेथे आवश्यक ती मदत पुरविली जात आहे. एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराचे पथक बीडमध्ये सज्ज असून, ते बचावकार्य करीत आहेत. सुमारे 48 मंडळात काल अतिवृष्टी झाली आहे.

– नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून,परिस्थिती उदभवल्यास त्यांना स्थानांतरित करण्यात येईल.आष्टीमधून 60 नागरिकांना सुरक्षित हलविण्यात आले आहे.सप्टेंबरपासून 2567 कुटुंबांना सुरक्षित स्थलांतरित करावे लागले.10 लोकांना प्राण गमवावे लागले. त्यापैकी 8 कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, रविवारी सकाळी ४८ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग दीड लाख क्युसेकपर्यंत वाढवण्याच्या संदर्भाने सूचना देण्यात आली होती. परिणामी जवळपास वाड्या-वस्त्या मिळून ६१ गावांना पुराने वेढण्याच्या भीतीने गेवराई, माजलगाव तालुक्यातील काही गावांतील नागरिकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. खबरदारी म्हणून मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ) व लष्कराचे पथकही जिल्ह्यात दाखल झाले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे परिस्थिती गंभीर बनू लागलेली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
जिल्ह्यातील सर्व यंत्रणा योग्य प्रकारे काम करीत आहे की नाहीत, हे तपासून पाहा. यासाठी प्रत्यक्ष संबंधित ठिकाणांना भेट द्या, असे निर्देश.सरसकट पंचनामे करा. कुठेही नियमावर किंवा कायद्यावर बोट ठेवून लोकांना त्रास होईल,अशी वर्तणूक नको,अशा सूचना देण्यात आल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!