ऑनलाइन वृत्तसेवाबीड

काळजी घ्या;मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता;बीड जिल्ह्यात रेड अलर्ट

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.मध्यरात्रीपासूनच राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे

आजपासून संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. या पावसाचा जोर पुढचे काही दिवस कायम राहणार असल्याने हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही भागात या कालावधीत कमी वेळात अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असाही अंदाज आहे.

आज पावसाचा अंदाज कुठे

मेघगर्जनेसह पाऊस

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट परिसर, नाशिक घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर,अहिल्या नगर, जालना, बीड, परभणी

मुसळधार पाऊस

कोल्हापूर, सोलापूर, लातूर,चंद्रपूर, गडचिरोली ,गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ

राज्यात आत्तापर्यंत ११३ टक्के पाऊस

राज्यात १ जून ते २५ सप्टेंबर या कालावधीत सरासरी ९७०.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असतो. यंदा या कालावधीत सरासरी १०९८.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच १३ टक्के अधिक पाऊस झाला आहे. दरम्यान, राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

मोसमी वाऱ्यांची माघार

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी बुधवारी आणखी काही भागातून माघार घेतली आहे. मोसमी वाऱ्यांची सीमा गुरुवारी बुशहर, रामपूर, हरिद्वार, मुरादाबाद, इटावा, बांसवाडा, वलाभ, विद्यापीठ नगर, वेरावळ या भागात आहे. मोसमी वारे पुढील दोन दिवसांत राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या काही भागांतून परतण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!