नवनरात्रोत्सवापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता;कोणत्या जिल्ह्यांत यलो अलर्ट आहे?
देशभरातील कैक राज्यांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली असून, आता हा परतीचा पाऊस बहुतांश भागांमध्ये धुमाकूळ घातलाना दिसत आहे. केंद्रीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मानसानू सक्रिय असल्या कारणानं राज्याच्या बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ अशा भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.
तर पर्वतीय भागांमध्ये पावसाचं थैमान इतक्यात थांबणार नसून हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये अनेक अडचणी डोकं वर काढणार असल्याचं म्हटलं जात आहे.
इथं महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीपासून गोव्यापर्यंत पुढील 24 तासांमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगानं वाऱ्यासह पावसाची हजेरी असेल तर, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस जोरदार हजेरी लावताना दिसेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
नवनरात्रोत्सवापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
राज्यात असणारं ढगाळ वातावरण आणि पाऊस इतक्यात माघार घेणार नसून 25 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या इशाऱ्यामुळे दांडिया आणि गरबाप्रेमींचा हिरमोड होण्याचीही शक्यता आहे.
यंदा रेनकोट, छत्र्या घेऊन दांडिया आणि गरबा खेळावा लागणार का? अशी भीती त्यांना सतावतेय. नवरात्रोत्सवादरम्यानही पावसाच्या सरी बरसतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला . घटस्थापनेला मुंबईमध्ये हलक्या सरी असतील, अशी शक्यता आहे. त्यानंतरच्या दिवसांत मात्र मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होऊ शकते. पावसाचा जोर राज्यात 25 सप्टेंबरपासून अधिक वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
पावसाचा मुक्काम नेमका का लांबतोय?
बंगालच्या उपसागरामध्ये नव्यानं कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असून, राज्यात त्याच कारणानं पावसाचा जोर वाढत आहे. तिथं दक्षिण भारतावरही पावसाचं सावट असून, मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास यावेळी धुमाकूळ घालतच सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान महाराष्ट्रातील पर्जन्मानाच्या पूर्वानुमानानुसार कोकण वगळता राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून, धरणं आणि नद्याही आता ओसंडून वाहू लागल्यानं अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
नाशिक, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली, नागपूर, नंदुरबार आणि वर्धा.
मन्सून कधी पूर्णपणे परतेल?
IMD नुसार,1 ऑक्टोबरपर्यंत काही भागांत पाऊस कायम राहील,पण ऑक्टोबरमध्ये हळूहळू माघार घेईल.
