जुन्या वाहनांना मुदतवाढ;वीस वर्षे वाहन चालवता येणार पण कधीपासून!
आता तुम्हाला तुमची २० वर्ष जुनी गाडी चालवता येणार आहे. केंद्र सरकारने कार आणि मोटारसायकल चालकांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यातील नियमांमध्ये बदल करुन जुन्या वाहनांचे वय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या वाहनांचे वय १५ वर्षांऐवजी २० वर्षे करण्यात आले आहे. पण यासाठी वेगळे पैसे द्यावे लागणार आहेत.मात्र हा नियम दिल्ली-एनसीआरमधील लोकांना लागू होणार नाही.
केंद्र सरकारने जुन्या वाहनांच्या मालकांना दिलासा दिला आहे. आता १५ वर्षे जुन्या वाहनांची नोंदणी २० वर्षांपर्यंत वाढवता येणार आहे.त्यासाठी अधिकचे शुल्क भरावे लागणार आहे. याचा अर्थ,जुने वाहन आता आणखी ५ वर्षे चालवता येणार आहे.केंद्र सरकारचा हा आदेश दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त संपूर्ण देशभरात लागू केला जाईल.
केंद्रीय मोटार वाहन नियम, २०२५ अंतर्गत नियमामध्ये सरकारने बदल केला आहे. रस्त्यांवरुन जुनी,प्रदूषणकारी वाहने हळूहळू कमी करणे आणि लोकांना नवीन वाहने खरेदी करण्यास प्रोत्साहित करणे हे या नियमामागील उद्दिष्ट आहे.अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाल्यापासून हे नियम प्रभावी मानले जातील.
यातील नव्या तरतुदींनुसार, अवैध वाहनांसाठी नूतनीकरण शुल्क १०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. दुचाकींसाठी हे शुल्क २,००० रुपये, तीनचाकींसाठी ५,००० रुपये आणि हलक्या मोटार वाहनांसाठी (एलएमव्ही) नोंदणी नूतनीकरण शुल्क १०,००० रुपये असेल. याशिवाय आयात केलेल्या दुचाकींसाठी २०,००० रुपेय आणि आयात केलेल्या चारचाकी वाहनांसाठी ८०,००० रुपये आकारले जातील. इतर श्रेणीतील वाहनांसाठी हे शुल्क १२,००० असेल.
