ऑनलाइन वृत्तसेवा

देशभरात मान्सून पुन्हा सक्रीय होणार;चार दिवसात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

आजपासून राज्यभरात पावसाची हजेरी लागणार असून हवामान विभागाने दक्षिण महाराष्ट्रासह तळ कोकणात तीव्र पावसाचे अलर्ट दिले आहेत.

11 जून- मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, पालघर, धुळे, जळगाव, नंदुरबार, बुलढाणा व कोकणात सिंधुदूर्ग वगळता इतर सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट आहे.

12 जून- सांगली,कोल्हापूर, सिंधुदूर्ग जिल्हयाला ऑरेंज अलर्ट, पालघर व नंदूरबार वगळता उर्वरित भागात पावसाचा यलो अलर्ट

13 जून- रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्हयांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नाशिक, धुळे, नंदूरबार व पालघर वगळता उर्वरित जिल्ह्यांना पावसचा यलो अलर्ट देण्यात आलाय.

14 जून- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट व मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांना यलो अलर्ट देण्यात आलाय.

राज्यात नैऋत्य मोसमी पावसांनी हजेरी लावल्यानंतर बेफाम पावसाने आधी नागरिकांची धांदल उडाली. सकल भागात पाणी साठल्याने प्रवाशांची तारांबळही उडाली. नंतर पावसाने उघडीप घेतली होती. आता राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. प्रादेशिक हवामान अंदाजानुसार, राज्याच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात 2-3 अंशांची घट होणार असून येत्या तीन ते चार दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मोसमी पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे. (IMD Forecast)

आयएमडीच्या अंदाजानुसार, 12 जूनपासून देशभरात मान्सून पुन्हा सक्रीय होणार असून पुढील काही दिवसांत पश्चिम किनाऱ्यांवर पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाला पोषक वातावरणामुळे राज्यभरात प्रचंड उकाडा वाढलाय. अनेक भागात हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!