ऑनलाइन वृत्तसेवा

दहावीच्या निकालाची अपडेट;या दिवशी लागणार दहावीचा निकाल ?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल अजून लागला नाहीये. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार, याबद्दल विद्यार्थ्यांकडून विचारणा केली जात आहे

यंदा १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे.या परीक्षेसाठी राज्यातील २३ हजार ४९२ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच निकाल जाहीर करणार आहे.इयत्ता दाहावीचा निकाल याच आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.दहावीचा निकाल या आठवड्यात,म्हणजे मे २०२४ च्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.दरम्यान, बोर्डाने अद्याप अधिकृत तारखांची घोषणा केलेली नाही.बारावीचा निकाल लवकर लागल्यामुळे पदवी प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होईल.त्याचप्रमाणे, दहावीचा निकाल लवकर लागल्यास अकरावीची प्रवेश प्रक्रिया देखील लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. बोर्डाने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. पण,“बारावीच्या निकालानंतर १० दिवसात दहावीचा रिझल्ट जाहीर करु,”असे बोर्डाने यापूर्वी सांगितले होते.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.

दहावीचा निकाल १४ किंवा १५ मे रोजी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.१२ मे रोजी गुरुपौर्णिमेची सुटी आहे. निकालाच्या एक दिवस तयारी करावी लागत असल्याने १२ मे रोजी सुटी असल्याने १३ मे रोजी निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे १४ किंवा १५ रोजी दहावीचा निकाल लागू शकतो. यापूर्वी बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल १५ मेच्या आत लागणार आहे. निकालाच्या दिवशी दुपारी एक वाजल्यापासून परीक्षार्थी त्यांचे गुण पाहू शकतील. त्यामळे बोर्डाची तयारी पाहता १३,१४ किंवा १५ मे या तीन दिवसांपैकी एका दिवशी निकाल लागण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांनी निकालाच्या लॉगिन विंडोमध्ये आवश्यक लॉगिन तपशील भरणे आवश्यक आहे. एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी त्यांच्या मार्कशीट्स अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in द्वारे तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!