ऑनलाइन वृत्तसेवा

भाजपला सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले नाही-मुख्यमंत्र्यांची भाजपवर जोरदार फटकेबाजी

“आम्ही भाजपला सोडलं आहे, हिंदुत्व नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. आम्ही कमी पडलो तरी चालेल, पण खोटं बोलणार नाही. आमच्या महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्यांना मला विचारायचंय, युती असतानाही भाजपची मतं सेनेला का मिळाली नाही? खोटं बोलेन पण रेटून बोलेन, अशी विरोधकांची निती आहे. २०१९ मध्ये भाजपने काँग्रेसला कोल्हापुरात छुपी मदत केली होती की नाही?, भाजपसारखी आम्ही छुपी युती करत नाही, असे शाब्दिक हल्ले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर चढवले.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचे काँग्रेस उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. आपल्या भाषणात त्यांनी महाविकास आघाडी सरकारने कोल्हापूरकरांसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचला. पंचगंगा, रंकाळ्यासाठी भरीव काम करतो आहोत, असं सांगताना गंगा नदीत कोव्हिड काळात मृतदेह पडले होते, असा टोला त्यांनी लगावला.
विरोधकांकडे बोलायला मुद्दे नाहीत. त्यांना धार्मिक मुद्दा पुढे करायचाय. खोटं बोलणं आमच्या रक्तात नाही. जनतेसाठी जे केलं ते ठासून सांगू, जे नाही त्यात कमी पडलो म्हणून सांगू, पण खोटं बोलणार नाही, कोल्हापूरला जे जे केलं, त्याची यादी घेऊन बसलोय, असं मुख्यमंत्री म्हणाले.

कोल्हापुरसाठी जे केलं त्याची यादी घेऊन बसलोय. पंचगंगा नावाप्रमाणे स्वच्छ असली पाहिजे, प्रेतं टाकलेल्या गंगेसारखी नको.
देशातही एकाला भाजपने हिंदुहृदय सम्राट करण्याचा प्रयत्न केला.
हिंदुहृदयसम्राटांबद्दल प्रेम असेल तर मग अमित शहांनी दिलेला शब्द का मोडलात?
नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचा नाव देण्यास भाजपचा विरोध का?
भाजपच्या झेंड्यावर अटलजी, अडवाणींचा फोटो का दिसत नाही?.
मोदींचा फोटो ग्रामपंचायतीवर आहे, समजतच नाही की पंतप्रधान आहे की सरपंच..?
बेळगावमधील मराठी माणसांसाठी भाजपचं कुणी रस्त्यावर उतरलं का?अशी फटकेबाजी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *