बीड

शासनाने पीक विमा कंपनीची नियुक्ती तात्काळ करावी- अरुण डाके

बीड/प्रतिनिधी
खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पिक विमा उतरवण्यासाठी सरकारने मराठवाड्यातील दहा जिल्ह्यांसाठी विमा कंपनीची तात्काळ नियुक्ती करावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण डाके यांनी केली आहे
मराठवाड्यातील दहा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा पिक विमा उतरवण्यासाठी अजूनही विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे गेल्या वर्षीही सरकारने दखल घेतली नाही त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा पिक विमा उतरवण्यासाठी विमा कंपनीची तात्काळ नियुक्ती करावी अद्याप पर्यंत कुठलीही विमा कंपनी हे काम करण्यास तयार झालेली नाही येणाऱ्या खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याची काळजी घेण्यासाठी सरकारने आता विमा कंपनीची नियुक्ती करणे गरजेचे आहे शासनाने विमा कंपनीची तात्काळ नियुक्ती करावी अशी मागणी अरुण डाके यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *