महाराष्ट्रमुंबई

वाढीव वीजबिलासंदर्भात दिवाळीपर्यंत नागरिकांना लवकरच गोड बातमी

मुंबई 02 नोव्हेंबर: राज्यातील ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिलाचे (Increased electricity bill) चटके अजुनही ग्राहकांना बसत आहेत. त्यावरून राज्यात वादळही निर्माण झालं होतं. आता या प्रश्नावर लवकरच दिलासा मिळेल असे संकेत ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin raut) यांनी दिले आहेत. दिवाळी आधी निर्णय होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, वाढीव वीज बिल संदर्भात मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, वित्त विभागात फाईल गेली आहे, अर्थमंत्री अजित पवार कोरोना झाला त्यामुळे ते आले की निर्णय होईल. पण दिवाळी आधी लोकांना दिलासा मिळेल असे संकेतही राऊत यांनी दिले.

लॉकडाउनच्या काळात लोकांना वीजेची अव्वाच्या सव्वा बीलं आली होती.
त्यावरून असंख्य तक्रारी केल्या गेल्या. राजकीय पक्षांनीही आवाज उठवला होता.
‘0 ते 100 युनिटपर्यत वीज फ्री देण्याबाबत मी ऊर्जामंत्री म्हणून सांगितलं आहे.